खेड तालुक्यात चाललंय काय?
खेड तालुक्यातील एक मतदार जो गेली वीस वर्ष विद्यमान आमदाराच्या विरोधात मतदान करत आलो, पण माझ्या मताचा उपयोग २०१४ ची निवडणूक सोडता कधी झालाच नाही. कारण फक्त विधानसभेला इच्छुक असणारे जास्त उमेदवार व त्यामुळे होणारी मतांची विभागणी. आणि यावेळी पण तेच दिसतंय खेड तालुक्यात. नुकतीच देशभर लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आणि नेहमीप्रमाणे शिरुर लोकसभेत सुध्दा पुन्हा प्रमुख दोन उमेदवार समोरासमोर उभे राहिले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत कामाला लागलेले आहेत.
काही पक्षाचे कार्यकर्ते मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पळापळ करत आहेत, तर काही उमेदवाराच्या प्रेमापोटी, तर काही उमेदवाराला विरोध म्हणून आणि काही पक्षाची भूमिका म्हणून कामाला लागलेले आहेत. पण सगळ्यात वाईट अवस्था खेड तालुक्यातील कार्यकर्त्यांची झालेली आहे. ज्यांनी मागच्या वेळेस ज्या उमेदवाराच्या विरोधात काम केले त्यांना आजइच्छा नसताना त्याच उमेदवाराचे काम करावे लागत आहे.
२००४ पासून खेड तालुक्यातील एका दृष्ट प्रवृत्तीच्या विरोधात जे कार्यकर्ते गेली वीस वर्षे लढत आहेत, त्यांना मागील चार लोकसभा निवडणुकीमध्ये प्रामाणिक काम करून सुध्दा विधानसभेच्या निवडणुकी वेळेस लोकसभेला निवडून गेलेल्या खासदाराने चारही वेळेस कधीच विद्यमान आमदाराला पराभूत करण्यासाठीचे गणित जुळवण्यासाठी मदत तर केली नाही. उलट विधानसभेला स्वतःच्या फायद्यासाठी एक पेक्षा अधिक उमेदवार तयार करून गणित बिघडवण्याचेच काम केले. आत्ताही चालू लोकसभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदाराच्या विरोधातल्या उमेदवारांकडून तेच केले जात आहे. पद्धतशीरपणे सर्वच विधानसभेच्या इच्छुकांचा वापर करून व नवनवीन इच्छुक तयार करून जे दोन-चार जण खरंच प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांच्यामध्ये कोणाला नव्याने प्रवेश देऊन किंवा मित्र पक्षाला जागाच मिळणार नाही असे वातावरण तयार केले जात आहे, पक्ष फुटी नंतर शांत पडलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाकडून विधानसभेचे प्रलोभन दाखवून काम करायला सांगितले व आता त्यांनाच डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला जात आहे, आणि जे कुठेच नाहीत त्यांचा सर्वे चांगला आहे असे म्हणून सर्वच विधानसभेच्या इच्छुकांमध्ये भांडणे लावून विद्यमान आमदाराच्या विरोधात एक पेक्षा अधिक उमेदवार कसे करता येतील याची पद्धतशीर सुपारी लोकसभेच्या उमेदवारांनी घेतलेली आहे.तो लोकसभेचा उमेदवार हा ना नवीन पक्षात घेतलेल्या इच्छुकाचा आहे, ना पहिल्या दिवसापासून पक्षात कोणीही नसताना प्रामाणिकपणे काम करणाऱ्याचा आहे, ना बिन शर्त कसलीही अट न घालता काम सुरू करणाऱ्या मित्र पक्षाच्या इच्छुकांचा आहे. तो लोकसभेचा लबाड उमेदवार हा फक्त विद्यमान आमदाराची सुपारी घेऊन पद्धतशीरपणे सर्वच विधानसभेच्या इच्छुकांमध्ये भांडण लावण्याचे काम करत आहे.
परंतु हे प्रचंड महत्वकांक्षा असणाऱ्या विधानसभेच्या इच्छुकांच्या लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. याचे उत्तम उदाहरण २००९ ला खेड तालुक्याने अनुभवलेले आहे. आज त्यावेळेस लढलेले तीनही उमेदवार एकमेकांशी बोलताना म्हणतात त्यावेळेस एक जण लढलो असतो तर नक्कीच आपल्यातला एक जण आमदार झाला असता. आजही तशीच परिस्थिती आहे, त्यामुळे विधानसभेच्या इच्छुकांनी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर एकत्र येण्यापेक्षा आत्ताच एकत्र येऊन योग्य ती भूमिका घेऊन तालुक्याच्या हिताचा निर्णय घेऊन तालुक्याच्या सर्वसामान्य माणसाला विधानसभेला एकास एक पर्याय देण्यासाठी आत्तापासूनच तयारी करावी. लोकसभेनंतर ते शक्य होणार नाही कारण तोपर्यंत लोकसभेचा लबाड उमेदवार हा सर्व इच्छुक उमेदवारांमध्ये भांडण लावण्यात यशस्वी झालेला असेल. याच्यावरती प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आत्मचिंतन करून योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती.
-एक खेड तालुक्यातील वीस वर्षात अन्यायाने ग्रासलेला अनुभवी मतदार..




Comments (0)
Facebook Comments (0)