इंद्रायणीला पूर; आळंदीतील चारही पूल पाण्याखाली, वारकरी-भाविकांनी आळंदीकडे येऊ नये-प्रशासनाचे तातडीचे आवाहन

इंद्रायणीला पूर; आळंदीतील चारही पूल पाण्याखाली, वारकरी-भाविकांनी आळंदीकडे येऊ नये-प्रशासनाचे तातडीचे आवाहन
इंद्रायणीला पूर; आळंदीतील चारही पूल पाण्याखाली, वारकरी-भाविकांनी आळंदीकडे येऊ नये-प्रशासनाचे तातडीचे आवाहन
इंद्रायणीला पूर; आळंदीतील चारही पूल पाण्याखाली, वारकरी-भाविकांनी आळंदीकडे येऊ नये-प्रशासनाचे तातडीचे आवाहन
इंद्रायणीला पूर; आळंदीतील चारही पूल पाण्याखाली, वारकरी-भाविकांनी आळंदीकडे येऊ नये-प्रशासनाचे तातडीचे आवाहन

आळंदी  : आषाढी वारी २०२६ निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन जारी केले आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे त्यांनी तातडीने पुढील प्रवास थांबवून ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित राहावे. कोणत्याही परिस्थितीत आळंदीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच पोलीस, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता नदीपात्र, घाट परिसर तसेच बंद करण्यात आलेल्या पुलांच्या दिशेने जाणे टाळावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्वांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी आणि देवाची आळंदी नगर परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.